शिवसेना चिन्ह

शिवसेना

श्री. वामन म्हात्रे

श्री. वामन बारकु म्हात्रे

नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद

शहरप्रमुख

शिवसेना, बदलापूर शहर

अधिकृत निवेदन व विकास प्रस्ताव

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग एरंजाड-बदलापूर विकास आराखडा

संदर्भ: मा. गडकरी साहेब यांना पत्र व्यवहार

एप्रिल २०२६

प्रति,

मा. ना. नितीनजी गडकरी साहेब

माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,

भारत सरकार, नवी दिल्ली.

पुढे जाण्यासाठी स्क्रीन सरकवा (Swipe)
Natural Lake
प्रस्ताव क्र. १

नैसर्गिक तलाव संवर्धन

एरंजाड येथील लोकोपयोगी तलाव वाचविण्याबाबत

सद्यस्थिती

एरंजाड गावातील तलाव महामार्गात बाधित होत नाहीये, परंतु प्रस्तावित ट्रक टर्मिनलच्या सीमेवर आहे. नगरपालिकेने सुशोभीकरणासाठी ५० लाख निधी मंजूर केला आहे.

धोका व महत्त्व

हा तलाव गावाची नैसर्गिक संपत्ती असून आणीबाणीत तहान भागवतो. केवळ व्यावसायिक हेतूसाठी याचा बळी देऊ नये.

आमची प्रमुख मागणी

सदर तलाव गावकऱ्यांसाठी सोडून द्यावा. जर तो बाधित होत असेल, तर महामार्ग प्राधिकरणाने दुसरीकडे नवीन तलावाची निर्मिती करून द्यावी.

Highway Entry Exit
प्रस्ताव क्र. २

महामार्ग एन्ट्री आणि एक्झीट

स्थानिक पातळीवर दळणवळण सुविधा

भौगोलिक स्थिती

एरंजाड येथे मोठे ट्रक टर्मिनल नियोजित आहे आणि येथूनच राज्य महामार्ग क्र. ८० जातो.

स्थानिकांची गैरसोय

महामार्ग गावाजवळून जात असला तरी, स्थानिकांना त्यावर जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध नाही.

आमची प्रमुख मागणी

बदलापूर किंवा एरंजाड येथे वाहनांसाठी अधिकृत एन्ट्री आणि एक्झीट मार्ग द्यावा. यामुळे पंचक्रोशीतील गावांचा विकास होईल.

Bridge over river
प्रस्ताव क्र. ३

उल्हास नदीवर समांतर पूल

वाहतूक कोंडीवर शाश्वत उपाय

बदलापूर शहराची सद्यस्थिती

५ लाख लोकसंख्या असलेले बदलापूर शहर महापालिकेच्या उंबरठ्यावर आहे. सापे-बदलापूर येथे महामार्गाचे मोठे जंक्शन येणार आहे.

भविष्यातील धोका

मुंबई आणि अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी जड वाहतूक शहरातून गेल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होईल.

आमची प्रमुख मागणी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, सापे ते बदलापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागूनच उल्हास नदीवर एक स्वतंत्र २-पदरी समांतर पूल बांधून द्यावा.

Local Employment
प्रस्ताव क्र. ४

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार

स्थानिकांचा सन्मान व न्याय

शेतकऱ्यांचे योगदान

या राष्ट्रीय प्रकल्पासाठी एरंजाड व बदलापूर परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन देऊन भूसंपादन प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले आहे.

व्यावसायिक संधी

महामार्गालगत ट्रक टर्मिनल, फूड प्लाझा, टोल प्लाझा व पार्किंग यांसारखे मोठे व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत.

आमची प्रमुख मागणी

शासकीय नियम आणि अटींमध्ये शिथिलता देऊन या प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या व व्यवसायांमध्ये प्राधान्याने सामावून घ्यावे.