नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद
शहरप्रमुख
शिवसेना, बदलापूर शहर
संदर्भ: मा. गडकरी साहेब यांना पत्र व्यवहार
एप्रिल २०२६प्रति,
मा. ना. नितीनजी गडकरी साहेब
माननीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,
भारत सरकार, नवी दिल्ली.
एरंजाड गावातील तलाव महामार्गात बाधित होत नाहीये, परंतु प्रस्तावित ट्रक टर्मिनलच्या सीमेवर आहे. नगरपालिकेने सुशोभीकरणासाठी ५० लाख निधी मंजूर केला आहे.
हा तलाव गावाची नैसर्गिक संपत्ती असून आणीबाणीत तहान भागवतो. केवळ व्यावसायिक हेतूसाठी याचा बळी देऊ नये.
सदर तलाव गावकऱ्यांसाठी सोडून द्यावा. जर तो बाधित होत असेल, तर महामार्ग प्राधिकरणाने दुसरीकडे नवीन तलावाची निर्मिती करून द्यावी.
एरंजाड येथे मोठे ट्रक टर्मिनल नियोजित आहे आणि येथूनच राज्य महामार्ग क्र. ८० जातो.
महामार्ग गावाजवळून जात असला तरी, स्थानिकांना त्यावर जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध नाही.
बदलापूर किंवा एरंजाड येथे वाहनांसाठी अधिकृत एन्ट्री आणि एक्झीट मार्ग द्यावा. यामुळे पंचक्रोशीतील गावांचा विकास होईल.
५ लाख लोकसंख्या असलेले बदलापूर शहर महापालिकेच्या उंबरठ्यावर आहे. सापे-बदलापूर येथे महामार्गाचे मोठे जंक्शन येणार आहे.
मुंबई आणि अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी जड वाहतूक शहरातून गेल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होईल.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, सापे ते बदलापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला लागूनच उल्हास नदीवर एक स्वतंत्र २-पदरी समांतर पूल बांधून द्यावा.
या राष्ट्रीय प्रकल्पासाठी एरंजाड व बदलापूर परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन देऊन भूसंपादन प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले आहे.
महामार्गालगत ट्रक टर्मिनल, फूड प्लाझा, टोल प्लाझा व पार्किंग यांसारखे मोठे व्यावसायिक प्रकल्प उभे राहत आहेत.
शासकीय नियम आणि अटींमध्ये शिथिलता देऊन या प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या व व्यवसायांमध्ये प्राधान्याने सामावून घ्यावे.